Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…! राज्यात पावसाचा जोर ओसरणार, पण ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस कोसळणार

Monsoon Update: राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. खरं पाहता, राज्यात एक जून पासून ते आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon) राज्यातील सुमारे 28 जिल्हे प्रभावित झाले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon News) राज्यातील एकूण तीनशे नऊ गावे प्रभावित झाले आहेत. या सर्व गावात पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली होती. यामुळे पावसाने विश्रांती घेतली असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांच्या तसेच सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या तीन दिवसात राज्यातील विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

यामुळे विदर्भ वासियांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी विदर्भात सर्वाधिक बघायला मिळाली यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र दोन दिवसांपासून विदर्भात देखील पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे अतिवृष्टीने निर्माण झालेली पूर परिस्थिती आता आटोक्यात येत होती. धरणातील पाणी देखील आता कमी होत होते. मात्र आता पुन्हा भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी पावसाचा अलर्ट जारी केल्याने विदर्भ वासियांची काळजाची धडधड वाढू लागली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते नागपूर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक झाला आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), राज्यात आज 25 जुलै रोजी पावसाची शक्यता आहे. राज्यातील पूर्व व पश्चिम विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज कोसळणार असल्याचे पंजाब राव यांनी स्पष्ट केले आहे.

मित्रांनो आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापुर, अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. म्हणजे आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या विभागात पावसाची शक्‍यता राहणार आहे.

मात्र असे असले तरी, पंजाब रावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार उद्या अर्थात 26 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंत राज्यात पावसाची उसंत राहणार असून या कालावधीत राज्यात सर्वत्र सूर्यदर्शन होणार आहे. 29 जुलैनंतर मात्र राज्यातील हवामानात मोठा बदल होणारं असून 31 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडणार असल्याचे भाकीत देखील पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe