Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला रे….!! 5 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार, या भागात कोसळणार धो-धो पाऊस

Ajay Patil
Published:

Monsoon Update: राज्यातील शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील पेरणीच्या कामासाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस (Rain) झाला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीचे कामे खोळंबली आहेत.

यामुळे या भागात अजून पेरणी झालेली नाही अशा भागातील शेतकरी बांधव पावसाची (Monsoon News) आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाय ज्या भागात पेरणी झाली आहे भागातील शेतकरी बांधव देखील पिकांच्या जोमाने वाढीसाठी पावसाची (Monsoon) वाट पाहत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी सुरुवातीच्या काळात पाऊस झाला मात्र पेरणी झाल्यानंतर पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधव मान्सूनच्या प्रवासाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. शेतकरी बांधव मान्सून अंदाजाकडे देखील अतिशय बारकाईने लक्ष ठेवत असतो. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचा नवीन सुधारित मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.

पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report) राज्यातील राहिलेल्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठे समाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh) यांच्या मते, राज्यात पाच जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पाच जुलै ते 12 जुलै या कालावधीत शेतकऱ्यांची पेरणी राहिली आहे त्या शेतकऱ्यांची पेरणी देखील शक्य होणार आहे. म्हणजेच या कालावधीत समाधानकारक पाऊस होणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले आहे. पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस कोसळणार आहे.

मात्र या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. पंजाब रावांच्या मध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार शिवाय नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळणार आहे.

निश्चितच पंजाबराव यांच्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झालेली नसेल त्या शेतकरी बांधवांची आता पेरणी देखील शक्‍य होणार आहे.

दरम्यान पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना ओल तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्र कृषी विभाग तसेच हवामान विभाग यांनी देखील शेतकरी बांधवांना जमिनीची ओल तपासून पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

कृषी विभागाच्या मते, शेतकरी बांधवांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अन्यथा शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. निश्चितच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या तसेच हवामान विभागाच्या आव्हानाला साद दिली पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe