Ketaki Chitale on Jitendra Awhad : आव्हाडांच्या अटकेनंतर अभिनेत्री केतकी चितळेचा इशारा, म्हणाली कठोर कलमे लावावीत… अन्यथा हायकोर्टात जाणार

Published on -

Ketaki Chitale on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल ठाणे वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी झालेल्या गोधळामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तक नगर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी कठोर कलमे लावण्याची मागणी अभिनेत्रीने केली आहे.

या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या वकिलामार्फत वर्तकनगर पोलिसांना नोटीस दिली आहे. या नोटीसनुसार त्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून त्यात वाढ करण्यात यावी.

नोटीसनुसार, ठाण्यातील सिनेमागृहावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जितेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. तथापि, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120B आणि 354 चा वापर केलेला नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी काही लोकांसह मराठी भाषिक मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष, तरुण-तरुणींवर अमानुष हल्ला केला होता. हा हल्ला सुनियोजित होता.

त्यामुळे हा हल्ला कट रचून करण्यात आल्याने कलम 120B लागू आहे. तसेच, जेव्हा तक्रारदार आपल्या पत्नीवर हात उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विनयभंगाच्या संदर्भातही कलम 354 लागू आहे.

जास्तीत जास्त दिवसांच्या रिमांडला तसेच जामीनाला विरोध करण्यात यावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. आव्हाड यांचा मागील इतिहास लक्षात घेऊन केतकी चितळे हिने

वर्तक नगर पोलिसांच्या कायदेशीर सल्लागाराच्या वतीने नोटीस बजावण्यात आली असून, तसे न करता पोलिसांनी आव्हाड यांना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News