अहमदनगर ब्रेकिंग ! वाळू तस्करी करणारे ढंपर दिले पेटवून

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करी सुरु आहे. दरम्यान या नदी पात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांना मिळाली.

तातडीने पोलीस व महसूल प्रशासनने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात तीन वाळु गाड्या पकडल्या. एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे काम सुरू असताना दरम्यानच्या काळात मागे अंधारात दोन वाळूच्या ट्रक कोणीतरी अज्ञात इसमांनी पेटवून दिल्या.

पोलीस व महसूल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जळलेल्या वाळू गाड्या व पकडलेली एक वाळू गाडी अशा तीन गाड्या जप्त करून श्रीरामपूर तालुका पोलिसांकडे देण्यात आल्या आहेत.

या दोन गाड्या अंधारात जमावाने पेटविल्या ? कि वाळू तस्करी मधील स्पर्धेतून पेटविण्यात आल्या ?या जळालेल्या ढंपरचा मालक कोण आहे ? नेमक्या कोणत्या तस्कराच्या या गाड्या आहेत ? या सर्व बाबींचा तपास होत आहे.

दरम्यान वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे नायगाव भागात तातडीने पोलिस चौकी सुरू करावी अशी आग्रही मागणी नायगाव ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News