बिग ब्रेकिंग : राज्यात होणाऱ्या ‘त्या’ निवडणुका झाल्या रद्द !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागांवरील पोटनिवडणुका अखेर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

कोरोनाची दुसरी अद्याप पूर्णपण ओसरलेली नाही, त्यातच कोरोनाची तिसरी आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनेही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती.

त्यानुसार राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला,

वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी

१९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते.

त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे.

कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!