RBI Repo Rate : काही दिवसांपूर्वी कर्जाचा ईएमआय वाढला होता. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अशातच आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याचौ शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा कर्जाचा ईएमआय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एप्रिलमध्ये चलनविषयक धोरण समिती रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स वाढ करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर याचा परिणाम बँक ठेवीदार आणि नवीन कर्जदार यांच्यावर होऊ शकतो. दरम्यान कर्जाचा ईएमआय वाढण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल अनेकांना पडत असेल.

यूएस मधील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक नुकतीच बंद झाली असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह देशाच्या बँकिंग प्रणालीला दिलासा देण्यासाठी दर वाढ रोखू शकेल. तर भारताच्या बँकांवर थोडासा दबाव असू शकतो, ज्यामुळे जास्त पैसे सामान्य लोकांकडे जातील.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई रोखण्यासाठी मे 2022 पासून रेपो दरात एकत्रितपणे 250 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे.
काय होणार परिणाम ?
त्यामुळे निश्चितच मुदत ठेवी गुंतवणूकदारांना आनंद मिळतो, कारण रेपो दर वाढले तर बँका ठेवींच्या उच्च टक्केवारीचा फायदा ग्राहकांना देऊ लागतील.त्याच वेळी, बँक कर्जाच्या दरात वाढ झाली असल्याने प्रत्यक्षात बँक ठेवीदार आणि नवीन कर्जदार या दोघांवर थेट परिणाम होणार आहे. रेपो दरात वाढ झाली तर त्यानंतर बँका त्यांच्या ग्राहक कर्जावरील व्याजदर वाढवतात. कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यानंतर मासिक ईएमआय वाढवण्याऐवजी ते अनेकदा कर्जाचा कालावधी वाढवतात.