महापौर पदावर काँग्रेसचा दावा! ‘यांच्या’नावाचा केला ठराव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.

राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. जातीयवादी पक्षाला बाजुला करत

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याची सांगत आता काँग्रेसने महापौर पदावर आमचा दावा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यातच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अनुसूचित जाती विभागातून पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या शीला दीप चव्हाण यांना महापौर करण्याबाबतचा ठराव पक्षीय व्यासपीठावर संमत केला असल्याची माहिती काळे दिली आहे.

महापौरपदासाठी आता काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर कंबर कसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सोडचिठ्ठी घेत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर मनपामध्ये एकत्र येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे मनपात पाच नगरसेवक आहेत.

संख्यात्मक दृष्ट्या जरी काँग्रेसची ताकद कमी असली तरी देखील मनपा स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला तसेच शिवसेनेला प्रत्येकी तीन वेळा महापौर पद मिळाले आहे.

एक अपवाद वगळता काँग्रेसला मागील अनेक वर्षांपासून शहरात संधी मिळाली नाही. सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाकडे महापौरपदाच्या आरक्षणासाठी असणारा सक्षम उमेदवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe