कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आगामी काळात काळजीपूर्वक काम करा. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करु नका

तसेच या कोरोनाच्या लढाईत संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांनी शिथिलता येवू देऊ नये,असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाय योजना आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते .यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे ,नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,सभापती सुनंदाताई जोर्वेकर,उपसभापती नवनाथ अरगडे,उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री,

प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. सुरेश घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आर.आर.पाटील,

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडूरंग पवार, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते. ना. थोरात म्हणाले की, कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तालुक्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट केल्या जात असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. तालुक्यात सध्या ५० गावे कोरोनामुक्त झाली आहे. मात्र आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करावयाचा आहे.

यासाठी प्रत्येक गावातील ग्राम रक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना कोणतीही लक्षणे आढळल्याचे तातडीने विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोणा मुक्तीचा मार्ग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News