कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चिंतेत !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे पहायला मिळत आहेत. नगरसह सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतर्क­यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, आता पुन्हा दिवसागणिक ते दर कमी होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगला चिंतेत पडला आहे. त्याचसोबत पालेभाज्या देखील स्वस्त झालेल्या आहेत.

शनिवारी नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये ४८ हजार २०८ गोण्यांची कांद्याची आवक झाली.एक नंबर चे कांद्याला दोन हजार ते दोन हजार ४०० रुपये भाव मिळाला. दोन नंबरला १२०० ते २००० रुपये.

गोल्टी कांद्याला ७०० ते १२०० रुपये जोड कांद्याला पाचशे ते सातशे रुपये भाव मिळाला. प्रचंड कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग? याशिवाय आता दुसरे करायचे तरी काय असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

पालेभाज्या : टोमॅटो ५०० – १०००, वांगी ५०० – १२००,काकडी १००० – २०००, दोडके १००० – ३०००, गवार ५००० – ९०००, बटाटे ६०० – १२००, हिरवी मिरची ३००० – ४०००, मेथी ४०० – ६००,कोथिंबीर ४०० – ६००.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News