राज्यातील ‘हे’ कर्मचारी १९ एप्रिलपासून संपावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने १५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते.

मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत ६० हजार कर्मचारी येत्या १९ एप्रिलपासून संपावर जाणार आहेत.

या संपात कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे, उपाध्यक्ष आत्माराम घुणे, जिल्हा सचिव दिलीप डिके,

राहुरी तालुका अध्यक्ष रामदास ससाणे, उपाध्यक्ष ज्ञानदेव डुकरे, कार्याध्यक्ष संदिप जेऊघाले, सचिव अमर नेहे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

साठ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर येथे भव्य लॉंगमार्च, ०७ जानेवारी २०१९ ला भव्य अधिवेशन घेतले होते.

तत्कालीन राज्यमंत्री दादाजी भुसे अधिवेशनात मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन दिले होते. तसेच लातूर अधिवेशनात ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.

मात्र अद्यापपावेतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील ६० हजार कर्मचारी १९ एप्रिलपासून मुबंई येथील मैदानात बेमुदत संपावर जाणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!