अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे नगर मध्ये होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी येत्या ३० एप्रिल पर्यंत पुरोहीत मंडळींनी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही अशी, माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.

अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत.
नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान,
कोरोना बाधित असल्याची माहिती लपवत आहेत. तर काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे असे सांगतात,
परंतू प्रत्यक्षात लोक गर्दी करत असतात. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो.
त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक पुरोहित आजारी आहेत. त्यामुळे सध्या दररोज कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव,
होणारे मृत्यू व पुरोहितांची सुरक्षितता आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने ३० एप्रिल पर्यंत अमरधाम मध्ये कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाही असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|