अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.
मात्र, आज 15 ऑगस्ट आणि रविवार असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली नाही. तर सोमवारपासून ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज रेल्वेकडून व्यक्त के ला जात आहे. मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांचीही लोकल प्रवासात भर पडू शकते.

तरीही मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फे ऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत (दुपारी ४ पर्यंत) लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेणाऱ्यांची एकू ण संख्या १ लाख २९ हजार ८८३ झाली. मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवलीकर यात आघाडीवर आहेत.
डोंबिवलीत एकूण ७ हजार ९१५ पासची, तर बोरिवलीत ४ हजार ७२ पासची विक्री झाली. दोन लसमात्रा घेतलेल्या आणि १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
त्यासाठी ११ ऑगस्टपासून मध्य व पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी सुरू करण्यात आली. त्यासाठीही मदत कक्ष उभारण्यात आले.
आजपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल :- आजपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडे राहतील.
मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम