आता प्रत्येक ग्रापंचायत होणार ऑनलाईन …! पाणी, लोकसंखेसह जनावरांचेही नियोजन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या धोरणानुसार ५५ लिटर प्रमाणे कुटुंबाला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छ्ता टिकून रहावी.

यासाठी कोबो टूलच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाइन करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यभरात “गाव विकास कृती आराखडा” निर्मिती साठी विशेष अभियानाची अंमलबजावणी चालू आहे.

या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परीषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक, जलसूरक्षक, आशाताई, अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले.

गाव कृती आराखडा माध्यमातून शाळा , अंगणवाडीत असलेल्या नळजोडणी गावातील प्रमुख पिके तसेच येणाऱ्या काळात गावातील कुटुंबांना लागणारे पाणी गावची लोकसंख्या जनावरांची संख्या अशा वेगवेगळ्या घटकांचे नियोजन करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News