शरद पवार संतापले ! म्हणाले 5 वर्षांच्या कारकिर्दीत असे पाहिले नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- संसद हे लोकशाहीचं मंदिर असतं. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाच्या माध्यमातून देशाला सामाजिक न्यायाची व विकासाची नवीन सुरूवात मिळत असते. मात्र हे पावसाळी अधिवेशन विविध मुद्यांमुळे वादळी ठरलं. पेगॅसस, कृषी कायदे, आरक्षण विधेयक, विमा व्यवसाय दुरूस्ती विधेयक यावर प्रचंड चर्चा झाली.

सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांचं बोलणं सरकारने ऐकून घेतलं नाही. विरोधक विरोध करताना सभापतींना घेराव घालत असतात पण हे करत असताना विरोधी पक्षांच्या महिला खासदारांना जो त्रास दिला गेला हे दुर्देवी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

तसेचं माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत आज जे राज्यसभेत घडलं, असं कधीही झालं नव्हतं. बाहेरून 40 हून अधीक महिला आणि पुरूष बोलवण्यात आले व त्यांच्या मार्फत महिला खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आलं हे वाईट होतं. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, विमा दुरूस्ती विधेयक पटलावर ठेवलं गेलं यावर चर्चा करत असताना हा गैरप्रकार घडला आहे. काॅंग्रेस, आप, शिवसेना आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावं यावरून सभापतींना घेरलं पण एवढ्या गोंधळात सुद्धा सरकारने हे विधेयक मंजूर केलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News