राज्यातील ‘ते’ शिखर पर्यटकांसाठी बंद ! ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  ट्रेकिंगचा छंद असलेल्या पर्यटकांसाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. ती म्हणजे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय बारी ग्रामपंचायतीने घेतला आहे.

त्यामुळे आता पर्यटकांना या काळात कळसूबाई शिखरावर जात येणार नाही. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.

समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. ट्रेकिंगचा छंद असलेल्या हजारो पर्यटकांची इथे रेलचेल असते. तसेच शिखरावर देवीचे मंदिर असल्याने दर्शनासाठी गर्दी होते.

मात्र, सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात तिसर्‍या लाटेचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणार्‍या लोकांसाठी कळसूबाई शिखर काही दिवस बंद ) राहणार आहे.

स्थानिक ग्रामस्थांना बाहेरून येणार्‍या पर्यटकांकडून बाधा होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News