शहरातील उड्डान पुलास क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे नाव द्यावे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- शहरातील चालू असलेल्या उड्डाणपुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे

जिल्हा प्रशासनाने या होणार्‍या उड्डान पुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फौंडेशन व इतर सामाजिक संघटनांनी केले आहे.

अहमदनगर शहरांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ अहमदनगर येथेच शिक्षण घेऊन केली आहे. असे महान कार्य अहमदनगर शहरात घडल्यामुळे त्यांचे नाव देणे उचित होईल, याची सर्वांना खात्री आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News