घरासमोर लावलेली रिक्षा पेटवली ..! नगरमध्ये ‘या’ भागात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  कोणीतरी अज्ञात इसमाने घरासमोर लावलेली रिक्षा पेटवून दिली. ही घटना शहरातील कल्याण रोड परिसरात रात्री दीड वाजता घडली आहे.

याबाबत अशोक कानडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात काही समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

नगर शहरात वारंवार वाहनांची तोडफोड करणे, वाहने पेटवून देणे अशा घटना घडत आहेत. या घटनांसंदर्भात त्या त्या हद्दीच्या पोलिस ठाण्यांमध्ये  गुन्हे दाखल होतात.

मात्र या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचा त्रास पोलिस घेत नाहीत. वारंवार अशा घटना शहरात घडत असल्याने संबंधित आरोपींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने रीक्षा पेटवून दिली. यात रीक्षाच्या सीटसह वरील छप्पर व मागील बाजू पूर्णत: जळून गेली असून सुमारे ४०ते४५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe