सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो.
प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हात धुतात, असेएका अहवालातून समोर आले आहे. उर्वरित लोक आपल्या आरोग्याबाबत उदासीन असतात.

प्रत्यक्षात बाथरूम, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुणं गरजेचं असतं. आपण तिथल्या फ्लशचा वापर करतो. नळाला हात लावतो. या ठिकाणी असंख्य बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपल्या हाताना चिकटतात आणि रोगराईला कारणीभूत ठरतात.
हात धुण्यामुळे आपण जवळपास १४ विकारांना लांब ठेऊ शकतो. आजारपणं टाळण्यासाठी आपल्याला फक्त ४० ते ५० सेकंद द्यायचे असतात. एवढ्या वेळेत आपण हात स्वच्छ धुवू शकतो. स्वच्छतागृह सार्वजनिक असो किंवा घरातलं, नियमित हात धुणं गरजेचं आहे.
- Intelligence Bureau Jobs 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात मेगाभरती! तब्बल 3,717 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
- पुण्याप्रमाणेच ‘या’ जिल्ह्यातही तयार होणार नवा रिंगरोड ! कसा असणार 60 किलोमीटर लांबीचा Ring Road ?
- महिन्याच्या 15 दिवसांतच पगार संपतोय? मग ‘ही’ 3 बँक खाती उघडाच, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील!
- सोन्याहूनही महाग विकलं जातं ‘या’ झाडाचं लाकूड, एक किलोची किंमत ऐकून लाखोंच्याही पुढे! जाणून घ्या त्याचे महत्व
- तब्बल 20 हजार कोटींची योजना! भारतीय हवाई दलाला मिळणार 6 अत्याधुनिक सुपर स्पाय विमाने, आता शत्रूंची खैर नाही