सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो.
प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हात धुतात, असेएका अहवालातून समोर आले आहे. उर्वरित लोक आपल्या आरोग्याबाबत उदासीन असतात.

प्रत्यक्षात बाथरूम, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुणं गरजेचं असतं. आपण तिथल्या फ्लशचा वापर करतो. नळाला हात लावतो. या ठिकाणी असंख्य बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपल्या हाताना चिकटतात आणि रोगराईला कारणीभूत ठरतात.
हात धुण्यामुळे आपण जवळपास १४ विकारांना लांब ठेऊ शकतो. आजारपणं टाळण्यासाठी आपल्याला फक्त ४० ते ५० सेकंद द्यायचे असतात. एवढ्या वेळेत आपण हात स्वच्छ धुवू शकतो. स्वच्छतागृह सार्वजनिक असो किंवा घरातलं, नियमित हात धुणं गरजेचं आहे.
- भारत पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 10 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? राज्यातील स्थिती कशी आहे?
- बापरे! अहिल्यानगरमध्ये रक्तदाब वाढवणाऱ्या औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक
- देशातील आपत्कालीन परिस्थितीमुळे ३ महिन्यांचे मोफत रेशन धान्य एकदम मिळणार, सरकारचे पुरवठा विभागाला आदेश
- आरबीआयचा स्टेट बँक ऑफ इंडियाला दणका ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ? पहा…
- महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार नवीन बस स्थानक ! 8 कोटी रुपये मंजूर, प्रस्ताव मंजुरीसाठी सादर