लंडन : कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेता न येणे आणि धीर खचण्यामागे भूक हेही कारण असू शकते. स्कॉटलंडमधील डुंडी विद्यापीठाच्या अध्ययनातून असे समोर आले आहे की, कामाच्या ठिकाणी मनुष्याची भूक त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेला बदलू शकते.
जे लोक जेवण करून ऑफिसला जातात, ते योग्य निर्णय घेतात. या अध्ययनात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना खाणेपिणे व पैसा व पुरस्कारासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. एकदा हे लोक भुकेले असताना आणि दुसऱ्यांदा भरल्यापोटी त्यांना ही विचारणा करण्यात आली.

त्यात असे दिसून आले की, जे लोक सामान्य रुपात जेवण करत होते, ते आपला संयम व निर्णयक्षमता ३५ दिवस टिकवू शकले. दुसरीकडे ज्यांनी जेवण केले नव्हते, त्यांचा संयम तीन दिवसांतच तुटला.
या अध्ययनाचे प्रमुख डॉ. बेंजामिन विन्सेंट यांनी सांगितले की, उपाशीपोटी व्यक्ती कसा व काय विचार करतो, हा या अध्ययनाचा हेतू होता. त्यात असे दिसून आले की, भूक माणसाच्या प्राथमिकता बदलून टाकते.
त्याचा त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. हे संशोधन मुलांवरही लागू होते. बऱ्याचदा मुले शाळेत जातेवेळी न्याहारी करत नाहीत. अनेक लोक कॅलरी कमी करण्यासाठी डाइटिंग करतात. दुसरीकडे काहीजण उपवास करतात, त्यांच्या या सवयीचा भविष्यात परिणाम पाहिला जाऊ शकतो. ही सवय त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला प्रभावित करू शकते.
- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी मिळणार एक्स्ट्रा सुट्टी, CM फडणवीस मोठा निर्णय घेणार
- Infosys Share Price: इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठा चढउतार! गुंतवणूकदार गोंधळात… बघा सध्याची स्थिती
- SBI Share Price: एसबीआयच्या शेअरमध्ये मोठी पडझड! पटकन वाचा फायद्याची अपडेट, नाहीतर…
- Mobikwik Share Price: ई-कॉमर्स कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात दिला 13.75% चा परतावा… आज बंपर तेजीत
- JK Tyres Share Price: जेके टायर्स शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या! किमतीत झाली मोठी वाढ…बघा ताजे अपडेट