सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.

परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात दोन चेहऱ्यांचे, बोलण्यात पटाईत पण विश्वास ठेवताना सावध राहा! जाणून घ्या त्यांचा खरा स्वभाव
- नागीणचे लक्षणे दिसताच तातडीने ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर त्रास!
- आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? आता एसटी थेट तुमच्या गावात येणार; तुम्हाला घेऊन जाणार अन् माघारीही आणून सोडणार
- व्हेजच्या नावाखाली फसवणूक; ‘या’ शाकाहारी पदार्थांतही असते मांस, जिलेटिन आणि अंडी!
- विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी! पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, अर्ज करण्यासाठी ‘ही’ असणार आहे शेवटची तारीख