अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत.
औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एस टी औरंगाबाद हुन राजगुरू नगर येथे जात असताना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रक ची जोराची धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला.
पण काय घडले हे कोणाला लवकर समजले नाही, अपघात झाल्याचे समजताच एकच आरडाओरडा झाला. यात 2८ प्रवाशी जखमी झाले.
बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल आणि अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी पाच ते सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहक समावेश आहे.
जखमींमध्ये औरंगाबाद व पुणे येथील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक व इतर वाहन चालकांनी मदत केली व जखमींना तातडीने रुग्णालयात हरवण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगितले जात आहे.
- …….तर ZP च्या शाळेतच 5वी व 8वी चे वर्ग भरणार; पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !
- Samsung चा सर्वात स्लिम स्मार्टफोन Galaxy S25 Edge ची लाँच डेट आली समोर; कोणती आहेत वैशिष्ट्ये? वाचा
- अहिल्यानगरला मिळणार नवीन सहापदरी हायवे ! डीपीआरचे काम सुरू, 6 महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे काम
- IDBI Bank Jobs 2025: IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; 676 जागांसाठी भरती सुरू!
- सातवा वेतन आयोग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ! वित्त विभागाचा जीआर निघाला, किती वाढला DA ? पहा…