अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत.
औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एस टी औरंगाबाद हुन राजगुरू नगर येथे जात असताना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रक ची जोराची धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला.
पण काय घडले हे कोणाला लवकर समजले नाही, अपघात झाल्याचे समजताच एकच आरडाओरडा झाला. यात 2८ प्रवाशी जखमी झाले.
बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल आणि अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी पाच ते सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहक समावेश आहे.
जखमींमध्ये औरंगाबाद व पुणे येथील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक व इतर वाहन चालकांनी मदत केली व जखमींना तातडीने रुग्णालयात हरवण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगितले जात आहे.
- व्यवसायात सतत अपयश येतंय? वास्तुशास्त्रातील 7 चमत्कारी उपाय करून पाहा, लक्ष्मीच्या कृपेने तिजोरी पैशांनी गच्च भरेल!
- OnePlus यूजर्ससाठी आनंदाची बातमी! तब्बल 13 जुन्या मॉडेल्सला मिळणार नवीन OxygenOS 16 अपडेट; UI, गेमिंग, बॅटरी सगळं बदलणार
- शुक्रवार उपाय : देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी लावा तुपाचा दिवा आणि…; घरात येईल सुख-समृद्धी!
- 10 हजारांपेक्षाही कमी बजेटमध्ये विकत घ्या ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, Amazon वर जबरदस्त टॉप-5 डील सुरू!
- ‘लाडकी बहीण योजने’तून तुमचं नाव काढलं तर नाही?, जून-जुलैचा हप्ता येण्याआधी ‘असं’ तपासा तुमचं नाव आहे की नाही!