प्राण्यांना कळतं आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे

Published on -

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  आत्महत्या कधी कोण करेल हे सांगता येत नाही. माणसांच्या मनात काय चालले हे अद्याप कोणाला कळले नाही.

मात्र कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही? अशी प्रतिक्रिया अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिली.

ते आज एका कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूरात बोलत होते. पुढे शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या कधी करतो हे कोणाला कळले नाही, श्रीमंत देखील आत्महत्या करतो.

मात्र माणसाने मजबूत असले पाहिजे. निसर्गाकडून, प्राण्यांकडून शिकावं आत्महत्या करू की नये. अभिनेता सुशांत सिंग च्या आत्महत्येवर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपावर बोलणं हा माझा प्रांत नाही, असं देखील अभिनेता सयाजी शिंदे यांनी सांगितलं.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News