अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.

शहर भाजपतर्फे माजी अर्थमंत्री स्व. जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात शोकसभेचे आयोजन केले होते. शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व. जेटली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेत उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, महिला आघाडीच्या अध्यक्ष गीतांजली काळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, हरिभाऊ डोळसे, शिवाजी दहिंडी आदींनी जेटली यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी खासदार गांधी म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून आपल्या आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत संपूर्ण देशातील न्यायालयात जलदगतीने न्याय होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोलाचे योगदान दिले.
त्यांची संसदेमधील अभ्यासपूर्ण भाषणे सर्व खासदारांना मार्गदर्शक असायची. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या जीएसटी टॅक्समुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी बसली आहे. नोटबंदी निर्णयही त्यांनी अत्यंत सक्षमपणे हाताळला. असे बहुआयामी अष्टपैलू व अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याचे फार दुःख होत आहे.
- SBI कडून 30 लाखांचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा सविस्तर
- 365 दिवसांच्या एफडीवर ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज !
- विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
- SBI CBO Jobs 2025: पदवीधरांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! CBO पदाच्या तब्बल 2964 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- …….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?