श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- बातमी कामाची ! ५० पैशांचे नाणे अजूनही चालू शकते का ? RBI ने स्पष्टच सांगितलं
- ‘या’ 200 झाडांच्या लागवडीतून शेतकरी झाला करोडपती ! 65 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळाला 10 कोटी रुपयांचा नफा
- पिवळ सोन पुन्हा चमकल ; ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला 6,250 रुपयांचा भाव
- 801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !
- पुणे मेट्रो बाबत महत्त्वाची अपडेट ! 27 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीस यांनी दिली माहिती













