मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व अशा पद्धतीच्या निकषांवर साधारण २५ आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यात नेमका कोणाचा नंबर लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

विधानसभेच्या या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना ‘युती’कडून होणार आहे. सुरुवातीच्या काळात हे दोन्ही पक्ष ‘स्वबळा’वर लढतील असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. पण, महायुती करूनच मोठा विजय मिळविण्याचे भाजपने नक्की केले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीला महाराष्ट्रात २२९ जागा मिळतील असा ‘सर्व्हे’ सांगतो. प्रत्यक्षात यश कितपण मिळेल याचा शेवटी हा अंदाजच आहे. पण, अशा आकडेवारीवरून विरोधकांना खच्ची करण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडणार नाही, असे सांगण्यात येते.
- RBI ची रेपो रेटमध्ये कपात, आता देशातील ‘या’ बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन
- त्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला ! म्हणाले कि,जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहणार…
- सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी
- Mutual Fund Lumpsum Investment | म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी 5 लाखाची गुंतवणूक केली तर 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ?
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….