पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी आणि मुजोरी जनतेने अनुभवली. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
महाजनादेश यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा काढली. उशिरा का होईना मतदार हा राजा आहे, आपण नाही हे त्यांना कळाल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
- ब्रेकिंग : MPSC भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल ! एमपीएससी परीक्षेमध्ये ‘या’ उमेदवारांना आता नो एन्ट्री
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार
- बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती
- ‘या’ महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल ! 4,200 कोटी रुपयांचा नवा एक्सप्रेस वे ‘हे’ 2 Expressway जोडणार
- Ahilyanagar Politics: अहिल्यानगरमधील भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस! जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा