पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी आणि मुजोरी जनतेने अनुभवली. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
महाजनादेश यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा काढली. उशिरा का होईना मतदार हा राजा आहे, आपण नाही हे त्यांना कळाल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
- विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ; 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद राहणार ! शाळा बंद असण्याचे कारण पहा…..
- चक्क किंग कोब्रासारख्या विषारी सापांसोबत राहतात माणसं, भारतातील ‘कोब्रा कॅपिटल’ची कहाणी तुम्हाला माहितेय का?
- विवाहित लोकांसाठी Post Office ची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार 1,11,000 रुपये व्याज, किती गुंतवणूक करावी लागणार ?
- महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरातील 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! सरकारची आत्ताची सर्वात मोठी घोषणा
- Reliance Share Price : शेअर बाजारात रिलायन्सचा जलवा ! गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने मिळाले नवे टार्गेट