‘अहमदनगर :- तुमच्यात बदल व्हावा म्हणून आम्ही सातत्याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्हीही बदला,’ असा सूचक सल्ला ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्यांना दिला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यापासून ते विजयापर्यंतच्या सर्वच घडलेल्या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्पांमधून व्यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली.

एका खासगी कार्यक्रमासाठी विखे यांनी बुधवारी (२९ मे) पुन्हा संगमनेरला हजेरी लावली. दोनच दिवसांपूर्वी घुलेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण होता.
विखे यांचे मुंबई येथून थेट मालपाणी हेल्थक्लबवर आगमन झाले. उद्योगपती मनीष मालपाणी, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर, मनीष मणियार यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीनंतर विखे यांनी संगमनेरवर लक्ष दिल्याचे दिसून येते आहे. भविष्यात विखे-थोरात यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची ही नांदी आहे.
केवळ भेटच नाही, तर राजकीय चर्चा आणि भेटीगाठीही ते संगमनेरमध्येच घेत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांच्या भेटींवरून दिसून येते
- काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?
- तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी देसाईंच्या विरोधात बदनामीचा गुन्हा केला दाखल!
- शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतरही पुणतांबा येथे विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, बससेवा सुरू करण्याची मागणी
- अहिल्यानगरमध्ये शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी पडकलं, पाच दिवसाची पोलीस कोठडी
- साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !