‘अहमदनगर :- तुमच्यात बदल व्हावा म्हणून आम्ही सातत्याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्हीही बदला,’ असा सूचक सल्ला ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्यांना दिला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यापासून ते विजयापर्यंतच्या सर्वच घडलेल्या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्पांमधून व्यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली.

एका खासगी कार्यक्रमासाठी विखे यांनी बुधवारी (२९ मे) पुन्हा संगमनेरला हजेरी लावली. दोनच दिवसांपूर्वी घुलेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण होता.
विखे यांचे मुंबई येथून थेट मालपाणी हेल्थक्लबवर आगमन झाले. उद्योगपती मनीष मालपाणी, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर, मनीष मणियार यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीनंतर विखे यांनी संगमनेरवर लक्ष दिल्याचे दिसून येते आहे. भविष्यात विखे-थोरात यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची ही नांदी आहे.
केवळ भेटच नाही, तर राजकीय चर्चा आणि भेटीगाठीही ते संगमनेरमध्येच घेत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांच्या भेटींवरून दिसून येते
- अहिल्यानगरमधील बाप-लेक एकाच वेळी झाले दहावी उत्तीर्ण! एकत्रित अभ्यास करून बापलेकानं मिळवलं यश!
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ 10 रेल्वे स्थानकातुन धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेत बदल्यांना झाली सुरुवात! पहिल्याच दिवशी २४ कर्मचाऱ्यांची बदली
- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले यांची बिनविरोध निवड
- सोन्याच्या किमतीत एकाच दिवशी 5 हजार रुपयांची घसरण ! 14 मे 2025 रोजीचे 10 ग्रॅम सोन्याचे भाव कसे आहेत? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?