अहमदनगर :- मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाला आणखी एका महिलेच्या मदतीने मारहाण करून तोंडात विष ओतले.
नवनागापूर येथील पितळे कॉलनीत 8 जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.22) रात्री उशिरा सासूसह एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
मंगल आव्हाड (रा. पितळे कॉलनी, नागापूर) असे आरोपी सासूबाईचे नाव असून मनिषा नावाची आणखी एक महिला यावेळी सासूबाई सोबत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भाऊसाहेब प्रभाकर साबळे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे विषाचा प्रयोग झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनीच पोलिसांत फिर्याद दाखल केली.
जावई भाऊसाहेब हे नेहमीच मुलीशी भांडण करतात. त्याचा राग मनात धरून त्यांनी जावयाच्या खुनाचा प्रयत्न केला.
पितळे कॉलनीतील घरी बोलावून जावई भाऊसाहेब यांंना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
त्यानंतर सासूबाई मंगल आणि मनिषा या दोघींनी त्यांच्या तोंडात काहीतरी विषारी औषध टाकल्याचे साबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी सासूबाई मंगल आव्हाड आणि मनिषा या दोघीविरोधात खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !