पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- जमीन, प्लॉटच्या खरेदी-विक्री बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल ! व्यवहाराला बसण्याआधी न्यायालयाचा निकाल समजून घ्या
- LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती
- सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता टाटा कंपनीचे ‘हे’ बॅटरी इन्व्हर्टर मिळणार फक्त 1100 रुपयात, 3 दिवसांचा बॅकअप
- GST Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजार रुपयापर्यंत बचत…कसे ते वाचा?
- Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरीत…. कधी येतील खात्यात पैसे?