पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- कितीही येउद्या मंदी, ‘हे’ 4 शेअर्स 2026 गाजवणारच ! विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो?
- बँक ऑफ महाराष्ट्राच्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड तारीख झाली फायनल
- महाराष्ट्रात यावर्षी कापसाचे उत्पादन वाढले ! बाजारभाव इतक्या रुपयांनी घसणार
- कन्फर्म झालं ! धुरंधर ‘या’ तारखेला ओटीटीवर रिलीज होणार, Durandhar 2 ची रिलीज डेट पण जाहीर
- शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार, तर लाडक्या बहिणींना मिळणार आणखी पंधराशे रुपये ! 5 फेब्रुवारीआधी सरकार मोठा निर्णय घेणार ? कारण….













