पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून श्रीशैलमसाठी सुरू झाली नवीन बससेवा, पहा संपूर्ण वेळापत्रक
- Bank Of Baroda कडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?
- Ahilyanagar News : थोरात कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या भोजापुर चारीतून आलेल्या पाण्याने शेतकरी आनंदी
- 2 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका ; 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- कोणी फुटवेअर ब्रँडचा बादशाह,तर कुणी IT टायकोन!‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योजक कुटुंब