मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

‘महा’ चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थिची सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
- घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पैसे बुडण्याचा धोका!
- Ahilyanagar News : पावसात ‘तो’ झाडाखाली थांबला, इतरांनाही गप्पा मारायला बोलावले अन वीज कोसळली, क्षणार्धात मृत्यू…
- पुण्यात स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये ‘या’ जिल्ह्याचा दबदबा ! आकडेवारी ऐकून विश्वास बसणार नाही
- Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार की सुरू राहणार ? एकनाथ शिंदेंची घोषणा
- Pune Metro : पुणेकरांना मोठा झटका ! बहुचर्चित मेट्रोला होणार इतका उशिर…