मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या