मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळले तर ठाण्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा इशारा
- सोशल मीडियावर ‘असे’ फोटो शेअर केल्याने होऊ शकते नजर दोष, काय उपाय कराल?
- ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात दोन चेहऱ्यांचे, बोलण्यात पटाईत पण विश्वास ठेवताना सावध राहा! जाणून घ्या त्यांचा खरा स्वभाव
- नागीणचे लक्षणे दिसताच तातडीने ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर त्रास!
- आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? आता एसटी थेट तुमच्या गावात येणार; तुम्हाला घेऊन जाणार अन् माघारीही आणून सोडणार