अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे.

मात्र जैन समाजाचा अपमान झाल्याचे सांगत काही जणांचे माझ्यावरचे प्रेम उफाळून आले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली.
काही निर्णय राजकीय दुष्टीकोनातून घ्यावे लागतात. पक्षाने ते घेतले.त्यातून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली.पक्षाच्या या निर्णयाशी मी सहमत आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते.
पत्रकार परिषदेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भैय्या गंधे, किशोर बोरा उपस्थित होते.
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – शिरुर प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, ‘ह्या’ महामार्गासाठी तीन कंपन्या उत्सुक
- मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची मालमत्ता मृत्यूनंतर सासरच्या लोकांना की माहेरच्या लोकांना ? सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! सप्टेंबर अन ऑक्टोबरचा हफ्ता….
- ……तर आई-वडील, सासू-सासरे आपल्या कुटुंबियांना दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतात ! हायकोर्टाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय