अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे.

मात्र जैन समाजाचा अपमान झाल्याचे सांगत काही जणांचे माझ्यावरचे प्रेम उफाळून आले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली.
काही निर्णय राजकीय दुष्टीकोनातून घ्यावे लागतात. पक्षाने ते घेतले.त्यातून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली.पक्षाच्या या निर्णयाशी मी सहमत आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते.
पत्रकार परिषदेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भैय्या गंधे, किशोर बोरा उपस्थित होते.
- राहुरीतील शेतकऱ्यांची ६५ लाखांची फसवणूक, कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
- CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 600+ जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती….
- अहिल्यानगरमधील ३ हजार बेरोजगार तरूणांना व्यवसाय करण्यासाठी मिळाले २८ कोटी रूपयांचे कर्ज, जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दलची सविस्तर माहिती
- अहिल्यागरमधील ‘या’ गावातील प्रत्येक घरात आहे सरकारी नोकरदार; गावात ५०० शिक्षक, ५० पोलीस, २५ सैनिक तर १० अधिकारी
- अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक, मेथीची जुडी ३० रूपये तर दोडक्याला मिळाला ८ हजारांपर्यत भाव