श्रीगोंदा :- तालुक्यातील 35 गावांसाठी जीवनदायी ठरणारी साकळाई योजना पूर्ण तत्त्वास व्हावी, या मागणीसाठी दि.9 ऑगस्ट रोजी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पटांगणात अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साकळाई देवीचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली जाणार आहे. साकळाई योजनेचे आतापर्यंत निवडणूक लढण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.
खासदार सुजय विखे यांनीही हा मुद्दा निवडणुकीपूर्वी घेतला होता यापूर्वीच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही सकाळी योजनेचा मुद्दा फक्त निवडणुकीत काढला परंतु परंतु योजना पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला नाही.
या योजनेचे पन्नास वर्षापासून राजकारण चालू आहे योजना पूर्ण व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री यांना उपोषणा पूर्वी भेटणार आहोत साकळाई योजनेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील गावांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार नसेल तर त्यासाठी आम्ही प्रशासनाला पर्याय सुचविणार आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात हा विषयी मार्गी लागू शकत नाही. परंतु ही योजना होण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मिळणार मोठी भेट! ‘ही’ कंपनी देणार मोफत शेअर्स
- MPSC चा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय ! ‘या’ परीक्षेसाठी वयोमर्यादेत मिळाली शिथिलता, कोणाला मिळणार लाभ?
- सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याचा तयारीत , कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आठव्या वेतन आयोगात ‘हे’ 5 प्रकारचे भत्ते वाढवले जाणार
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! आयात शुल्क लागू होताच बाजारभावात मोठी वाढ, क्विंटलमागे किती रुपयांनी वाढलेत भाव?













