मुंबई :- राज्यात महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर झाले आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आता पुढे काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रापुढे आहे.
महाराष्ट्रावर सद्य:परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही शिवसेनेला अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र येईल आणि आपण सत्ता स्थापनेचा दावा करू अशी आशा आहे.

शिवसेनेने राज्यपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी वेळ वाढवून मागितली, परंतु राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला.
तरीही राजभवनाबाहेर पत्रकार परिषदे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा येऊ आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असे पत्रकारांना सांगितले आहे.
- राजधानी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! दहावी पास उमेदवारांना पण मिळणार सरकारी नोकरी
- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- लाडकी बहिण योजनेबाबत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा ! फडणवीस सरकारची विधिमंडळात मोठी माहिती
- आयुष्मान भारत योजनेतुन ‘या’ आजारावरवर मिळतो मोफत उपचार !
- मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ आगारातून राजस्थान येथील खाटूश्यामसाठी नवीन बससेवा सुरु, कसा असणार रूट?













