राज्यात उन्हाच्या काहिलीने लोक हैराण

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी उन्हाच्या काहिलीने लोकांना हैराण केले आहे. तापमान ४१ अंशापलीकडे गेल्याचे सोलापूर व अकोला येथे दिसून आले.

यावेळी सोलापूर येथे हंगामामध्ये सर्वात अधिक तापमान ४१.१ व अकोल्यात ४१ अंश इतके नोंद झाले आहे.काही ठिकाणी असणारे हवामान हे पूर्वमोसमी पावसाला अनुकूल असून त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील भागांमध्ये वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

तसेच उन्हाचा चटकाही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने काहीशी उघडीप देताच तापमानात मोठी वाढ झाली.

सोलापूर व अकोल्याबरोबरच जळगाव, सांगली, परभणी, अमरावती, नागपूर, वर्धा येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. तर पुणे, मालेगाव, सातारा, नांदेड येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे गेल्याने तेथे उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढलेले तापमान आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe