पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी ९२ टक्के झाली असता धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यांनतर आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरताच जायकवाडी प्रशासनाने धरणाचे बारा दरवाजे अध्र्या फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.
- अहिल्यानगरमधील बसस्थानके बनलेत गुन्हेगारांचे अड्डे, महिलांच्या दागिने-पैश्यांची सतत चोरी, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत
- Astrology: 15 जूनपर्यंत ‘या’ 3 राशींना मिळणार धन,यश आणि सन्मानाची भेट
- Bhadra Rajyog: भद्र राजयोगमुळे ‘या’ 3 राशी होणार करोडपती, तुमची राशी आहे का यात?
- अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर, इच्छुकांची नजर आयोगाच्या निर्णयाकडे
- Business Success Story: ‘हा’ तरुण दही विकून झाला कोट्याधीश! अंबानी,बिल गेट्सही आहेत ग्राहक