दोन्हीं पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब सुशांतच्या पूर्ण कुटुंबाची माफी मागितली पाहिजे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  सुशांत सिंग राजपूत च्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. सुशांतच्या परिवाराचे आणि देशभर त्याचे जे फॅन आहेत. त्यांचा अपमान करणारा आणि पीडित करणारे वक्तव्य आहे.

शिवसेनेने सुशांत चे वडील आहेत, त्यांना दोन पत्नी आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता.

महाराष्ट्राचे सरकार या 74 वर्षाच्या त्याच्या वडिलांना न्यायचं सोडून अपमान करतयं. अशा प्रकारचा दुर्देवी विधान करतयं, काय कारण आहे.

महाराष्ट्र सरकारला नेमकं कुणाला वाचवायचा आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब सुशांतच्या पूर्ण कुटुंबाची माफी मागितली पाहिजे. हे प्रकरण सी बी आय कडे देण्यात यावे. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News