अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार?
या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले.

पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला.
जेऊर बायजाबाई येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अयोजित करण्यात आली होती.
आमदार जगताप यांनी बायजामातेचे दर्शन घेऊन आठवडी बाजारात भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
आमदार जगताप आपल्या भाषणात म्हणाले, मी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करतो.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरून सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित केले होते. विरोधी पक्षनेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे.
मी शहरात रहात असलो, तरी माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. बाहेरचे लोक इथे येतील, गोड गोड बोलून मोठी स्वप्ने दाखवतील.
विकासाच्या केवळ वल्गना करून जनतेला स्वप्ने दाखवणारे २३ मार्चनंतर गायब होतील. पण मी कुठेही जाणार नसून कायम तुम्हाला भेटणारा आहे.
- मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची मालमत्ता मृत्यूनंतर सासरच्या लोकांना की माहेरच्या लोकांना ? सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! सप्टेंबर अन ऑक्टोबरचा हफ्ता….
- ……तर आई-वडील, सासू-सासरे आपल्या कुटुंबियांना दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतात ! हायकोर्टाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय
- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ट्रॅक्टरचे ट्रेलर खरेदी करण्यासाठीही मिळणार एक लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कुठे करावा?