राहुरी :- आपले शिक्षण कमी असले, तरी आपण फिल्डवर काम करतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत,
ते शासन दरबारी कसे मांडायचे आणि मंजूर करून घ्यायची हातोटी आपल्याकडे आहे.

त्यामुळेच राज्यात सर्वाधिक निधी राहुरी – नगर – पाथर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे.
आपण केलेला विकास कोणाला पहायचा असेल, तर या मतदारसंघात येऊन पहा, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील पोखर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
या वेळी आमदार निधीतून गणपती मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत बांधणे, राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २१ लाख रुपयांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन,
वन विभागाच्या योजनेतून १०० गॅस कनेक्शन वितरण, दलित वस्ती सुधार योजना, १४ व वित्त आयोग,
ग्राम निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटने करण्यात आली.
कर्डिले म्हणाले, गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांनी अनेकदा आपणास राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला.
परंतु प्रत्येक वेळी जनता भक्कमपणे पाठीशी राहिल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले.
आपले राजकारण हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांसाठी असते हे जनतेलाही चांगलेच माहीत झालेले आहे.
त्यामुळे नेते कितीही विरोधात गेले, तरी जनता बरोबर असल्याने आपण कोणत्याही निवडणुकीची चिंता कधी करत नसल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
- राज्यात हवामान अस्थिर; थंडी ओसरतेय, ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा इशारा
- अर्ज मुदतवाढीची शक्यता, जागांमध्ये वाढ; एमपीएससी राज्य सेवा 2026 उमेदवारांसाठी मोठी संधी
- कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट 7-सीटर! Renault Triber Facelift ठरतेय सर्वात स्वस्त आणि सुरक्षित पर्याय
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नाशिक परिक्रमा’ रिंग रोडला गती; रस्त्याची रचना, उंची व शेतकऱ्यांच्या शंकांचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
- पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता लवकरच! शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती













