संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत.
ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला.
आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
थोरात यांच्या हस्ते रविवारी संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानास प्रारंभ झाला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
शिवसेना-भाजपच्या सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री आमचाच’ यावर भाष्य करताना थोरात म्हणाले,
गेली पाच वर्षे भांडण करताना एकमेकांचे गळे धरणारे आता एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसतात. त्यांचे हे नाटक असते.
सत्तेत कुणाला आणायचे हे ते नव्हे, जनता ठरवणार आहे. आदित्य यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यात दौरा सुरू केला. तो तरुण आहे. त्याने राज्यात फिरले पाहिजे.असे थोरात म्हणाले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 4 जुलैपासून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या स्टेशनवर थांबणार?
- दारूपेक्षाही घातक असतात ‘सॉफ्ट ड्रिंक्स’, तरीही लोक फॅशनच्या नावाखाली आवडीने घेतात! सॉफ्ट ड्रिंक्सचे परिणाम वाचून धक्का बसेल
- येत्या 3 दिवसांत विनाशकारी त्सुनामी जग नष्ट करणार?, जपानी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ!
- पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- रथयात्रेच्या काळात ‘या’ राशींना लाभतो भगवान जगन्नाथांचा विशेष आशीर्वाद, होतात मालामाल!