संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत.
ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला.
आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
थोरात यांच्या हस्ते रविवारी संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानास प्रारंभ झाला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
शिवसेना-भाजपच्या सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री आमचाच’ यावर भाष्य करताना थोरात म्हणाले,
गेली पाच वर्षे भांडण करताना एकमेकांचे गळे धरणारे आता एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसतात. त्यांचे हे नाटक असते.
सत्तेत कुणाला आणायचे हे ते नव्हे, जनता ठरवणार आहे. आदित्य यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यात दौरा सुरू केला. तो तरुण आहे. त्याने राज्यात फिरले पाहिजे.असे थोरात म्हणाले.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?