अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे,
पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी तक्रार सुनील पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत केली.

पाचपुते म्हणाले, २१ ऑक्टोबरला टाकळी काझी येथील माझ्या मालकीच्या हॉटेल विजयमध्ये मी झोपलो असताना रात्री ११ च्या सुमारास माझ्यावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. माकडटोपी घातलेल्या तोंडाला रूमाल बांधून आलेल्या व्यक्तीने दगडाने वार केले. मी कसाबसा तेथून पळालो. तातडीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. माझ्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. घटनेला २३ दिवस झाले, परंतु पोलिस तपास करत नाहीत. चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांनी तातडीने आरोपीला पकडावे, अशी मागणी पाचपुते यांनी केली. या वेळी प्रकाश पाचपुते, बापूराव पाचपुते, विजय पाचपुते आदी उपस्थित होते.
- घर आवरताना 80% लोक करतात ‘ही’ चूक, फर्निचरचं नुकसान होतंच शिवाय आरोग्यही बिघडते!
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार जेट ! राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत अंबानी यांचा मोठा करार, अंबानीच्या कंपनीमुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार
- तब्बल 6000mAh बॅटरीसह पावसातही चालणारा फोन, फक्त ₹9,999 मध्ये! कुठे आणि कधी खरेदी कराल? जाणून घ्या
- ‘या’ राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला, कधीपासून मिळणार लाभ?
- चीनच्या ‘ग्रेट वॉल’ला विसराल असा किल्ला, राजस्थानमधील कुंभलगडचा इतिहास तुम्हाला थक्क करेल!