अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- ‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….
- मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी
- महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार
- पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील
- दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?