अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- अहिल्यानगर : चौंडीतील ऐतिहासिक बैठक रद्द ! मुंबईकडे वळले सरकार
- iPhone 16e लाँच किंमतीपेक्षा स्वस्त! Amazon वर सुरू आहे धमाकेदार डील
- HP चा मोठा धमाका,नेक्स्ट जनरेशन AI लॅपटॉप्स भारतात केले लॉन्च, किंमती ऐकून थक्क व्हाल
- 7300mAh बॅटरी आणि AI फीचर्ससह iQOO चे स्मार्टफोन्स झाले लॉन्च ! AI नोट्स, फास्ट चार्जिंग, गेमिंग पॉवरहाऊस…
- ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार, किती वाढला DA? वाचा…