अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार 10 हजार 440 रुपयांची वाढ
- पुढील वर्षी 10वी आणि 12वी ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय !
- Explained : नेवाशात लंघे-मुरकुटे युती ? गडाखांच्या डोक्याला ताप ! मतदारसंघच उरला नाही…
- SBI कडून 30 वर्षांसाठी 35 लाखांचे Home Loan घेतल्यास किती EMI भरावा लागणार ? वाचा…
- महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? नवीन तारीख पहा…