अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे
आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा.डॉ सुजय विखे ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते.

चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
- अंतराळात गेल्यावर अंतराळवीरांचे वजन कमी का होते?, कारण वाचून थक्क व्हाल!
- जिओचा धमाका! ‘हे’6 भन्नाट प्लॅन ₹70 रुपयांपेक्षाही स्वस्त, पाहा काय-काय फायदे मिळणार?
- ‘ह्या’ झाडांची घराजवळ लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो !
- निसर्गाचा चमत्कार! ‘हे’ फूल 100 वर्षांत फक्त एकदाच उमलते, तुम्ही ऐकलंय का या दुर्मिळ फुलाचं नाव?
- शुक्राच्या प्रभावामुळे कायम आकर्षक दिसतात ‘या’ जन्मतारखेचे लोक, अभिनेता अनिल कपूरच्या चिरतरुण व्यक्तिमत्वामागेही हेच रहस्य!