अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे
आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा.डॉ सुजय विखे ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते.

चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?