अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे
आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा.डॉ सुजय विखे ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते.

चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
- ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रं, AI रणगाडे…; भारताचा फ्यूचर डिफेन्स प्लॅन उघड!5 सुपर वेपन्स जे शत्रूला हादरवतील
- एका तुटलेल्या गाडीपासून बनली होती पहिली ‘रोल्स रॉयस’, वाचा जगातील सगळ्यात लक्झरी कारचा थक्क करणारा इतिहास!
- ‘या’ नवख्या कलाकाराने सलमान-अजयलाही मागे टाकलं! 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहाच!
- नेटवर्क फुल असतानाही कॉल अचानक डिस्कनेक्ट होतोय?, मग ‘ही’ सेटिंग लगेच चेंज करा!
- एखादा सामान्य व्यक्ती झोपण्यात किती वर्षे घालवतो?, आकडे ऐकून तुमची झोपच उडेल!