मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.
पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.

पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
- सुपा मंडळात अवघ्या तीन दिवसांत ५३.८ मिमी पावसाची नोंद, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान
- महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार ?
- अहिल्यानगरमध्ये स्व. अरूणकाका जगताप यांचा पुतळा उभा राहणार, व्यापारी संघटनांची मागणी
- सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल ! 19 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
- शेतकऱ्यांनो ‘एक रुपया पीकविमा’ योजना सरकारने केली बंद, आता वाढीव हप्ता भरावा लागणार, जाणून घ्या सविस्तर!