मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.
पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.

पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













