मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.
पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.

पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PF खातेधारकांसाठी सरकारने सुरू केली नवीन सुविधा
- जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का? समोर आली मोठी माहिती
- आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ
- Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?