अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.
भाजप, शिवसेना, रा.स.प., रिपाइं या महायुतीच्या वतीने भाजपने वैभवराव पिचड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल गुरुवारी पिचड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत पिचड बोलत होते.

आ. पिचड म्हणाले, राज्य बदलतयं, देश बदलतोय, आपणही बदलावे आणि विकासाच्या या उत्सवात सामील व्हावे, यासाठीच आपण भाजपत प्रवेश केल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. अकोल्याच्या विकासासाठीच आपण पक्षांतर केले असल्याचे ते म्हणाले.
- ATGL Share Price: शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण! अदानी ग्रुपचा ‘हा’ शेअर मात्र रॉकेट…कमाईची संधी?
- पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची खास योजना ! अकाउंट ओपन केल्यानंतर लगेचच मिळणार दरमहा 5 हजार 500 रुपयांचे व्याज
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?