अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.
भाजप, शिवसेना, रा.स.प., रिपाइं या महायुतीच्या वतीने भाजपने वैभवराव पिचड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल गुरुवारी पिचड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत पिचड बोलत होते.

आ. पिचड म्हणाले, राज्य बदलतयं, देश बदलतोय, आपणही बदलावे आणि विकासाच्या या उत्सवात सामील व्हावे, यासाठीच आपण भाजपत प्रवेश केल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. अकोल्याच्या विकासासाठीच आपण पक्षांतर केले असल्याचे ते म्हणाले.
- MBA करणाऱ्यांमध्ये कोण सर्वाधिक पैसा कमावतात? बी.कॉम की बी.टेकचे विद्यार्थी?, जाणून घ्या
- ट्रेन चुकली की तिकीट फेकू नका! TDR दाखल करताच मिळतो रिफंड, कसं ते जाणून घ्या
- 88 मुलांचे वडील, 44 रोल्स रॉयस आणि पटियाला पेग…, पटियालाच्या महाराजांचे आलीशान जीवन पाहून ब्रिटिशही थक्क झाले!
- वर्षाला तब्बल 500 कोटींचं दान, एकूण संपत्ती ऐकून डोळे फिरतील! भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?
- तब्बल ₹2510000000 चं घर! अभिनेता जॉन अब्राहमचं ‘व्हिला इन द स्काय’ पाहून थक्क व्हाल, पाहा फोटो