अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती.
मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना येथील उमेदवारी द्यावी लागली.

तसेच आपल्या वाट्याच्या तिसऱ्या शिर्डीच्या जागेवर स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा थोरातांच्या जोर्वे गावातील व कट्टर थोरात समर्थक असलेल्या सुरेश थोरातांना उमेदवारी देण्यात आली.
स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्ता ऐनवेळी विखेंना ‘मॅनेज’ होईल, या भीतीपोटी काँग्रेसने सुरक्षेचा उपाय म्हणून थोरातांच्या गावच्याच थोरातांना उतरविण्याची खेळी करावी लागली असल्याचे बोलले जात असले तरी स्थानिक स्तरावर पक्षाशी एकनिष्ठ असलेला कोणी सापडला नाही, हेही यातून स्पष्ट झाले.
- १० हजारपासून ५० लाखांपर्यंत देणगी द्या आणि साईबाबांच्या विशेष सेवेचा लाभ घ्या! साई संस्थानचं नवं व्हीव्हीआयपी सेवा धोरण जाहीर
- पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 5 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर
- अहिल्यानगरमध्ये आणखी एक बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा उघड, दिव्यांग नसतानाही प्रमाणपत्र मिळवून चार जणांनी घेतला निराधार योजनेचा लाभ
- भारतातील ‘या’ 5 रहस्यमयी गुहा; ज्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पहायला हव्यात
- जगातील फक्त ‘या’ 10 देशांत आहे दुर्मिळ खजिना; सोने-चांदी, हिरे- मोत्यांपेक्षाही आहे मौल्यवान