अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती.
मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना येथील उमेदवारी द्यावी लागली.

तसेच आपल्या वाट्याच्या तिसऱ्या शिर्डीच्या जागेवर स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा थोरातांच्या जोर्वे गावातील व कट्टर थोरात समर्थक असलेल्या सुरेश थोरातांना उमेदवारी देण्यात आली.
स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्ता ऐनवेळी विखेंना ‘मॅनेज’ होईल, या भीतीपोटी काँग्रेसने सुरक्षेचा उपाय म्हणून थोरातांच्या गावच्याच थोरातांना उतरविण्याची खेळी करावी लागली असल्याचे बोलले जात असले तरी स्थानिक स्तरावर पक्षाशी एकनिष्ठ असलेला कोणी सापडला नाही, हेही यातून स्पष्ट झाले.
- पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज
- नगर- जामखेड महामार्गावर पोलिसांकडून बनावट कारवायांचा धडाका
- अहिल्यानगर शहरात सुख,समृद्धी नांदू दे, सर्वांचे संकटे दूर होऊ दे, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची पांडुरंगाचरणी प्राथर्ना
- आमच्या गावात लिंबू खरेदी करायचे नाहीत असे म्हणत श्रीगोंद्यात व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण
- जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड सागर मोहोळकरची पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी