‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.
‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.

- ब्रेकिंग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, वाचा सविस्तर
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 5 आजाराच्या उपचारासाठी मिळणार दीड लाख रुपयांची मदत
- पुढील आठवड्यात शेअर मार्केट मधील ‘या’ 5 कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश वितरित करणार !
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ; निवडणुक आयोगाकडे काँग्रेसच्या तक्रारीनंतरही मकर संक्रांतीला पैसे मिळणार, CM फडणवीस म्हणतात….
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘या’ 2 भत्त्यात झाली मोठी वाढ!













