‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.
‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.

- खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?
- राहूरी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी, दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीची करण्यात आली सुटका
- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेणारा पती-पत्नीला अटक, चार दिवसाची पोलिस कोठडी
- अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांचा भाव तर पपईला ४ हजार रुपये भाव
- जामखेड शहरामध्ये चोरट्यांनी खताचे दुकान फोडत ३ लाखांचे खत, बियाणे व औषधे नेले चोरून