‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.
‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.

- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही
- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात ‘या’ मार्गावर धावणार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस, पुण्यालाही मिळणार नवीन रेल्वेगाडी
- सासू सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला पण अधिकार मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिलाय असा निकाल