कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या वेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, पाच वर्षांत तालुक्याची वाताहत झाली आहे. जनता आमदाराच्या कारभाराला कंटाळली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण होऊ नये व नवीन पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. तो रोष मतदान यंत्रातून व्यक्त होणार आहे.
- नवीन घर बांधताना ‘हे’ वास्तु नियम पाळाच, विशेषत: प्रवेशद्वार या दिशेलाच असावे; देवी लक्ष्मी राहील प्रसन्न!
- तुमचा मूलांक 3 आहे का? मग सावध व्हा! ‘या’ एका सवयीमुळे होऊ शकतं प्रचंड मोठं नुकसान!
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हा’ वास्तु उपाय! घरात पैशांची टंचाई कधीच भासणार नाही!
- जगभरात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक पाहून विश्वास बसणार नाही!
- AC पेक्षाही जास्त गारवा मिळेल, तेही कूलरमधून; फक्त वापरा ‘या’ सोप्या आणि स्मार्ट टिप्स!