कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या वेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, पाच वर्षांत तालुक्याची वाताहत झाली आहे. जनता आमदाराच्या कारभाराला कंटाळली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण होऊ नये व नवीन पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. तो रोष मतदान यंत्रातून व्यक्त होणार आहे.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग