मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा लोकशाही मानणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रपती कोणाच्या खिशात नसतात, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ईडी, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण आता कोणत्याही पक्षातील आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून यांनी फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
अशाच राजकारणामुळे राज्यातील जनतेने बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या हे त्याचेच फलित आहे. शरद पवारांच्या बाबतीत ईडीचे प्रकरण घडायला नको होते, असेही ते म्हणाले. हीच ती वेळ असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
- Ahilyanagar Politics : सुप्यातील उद्योजकांना पालकमंत्र्यांचा जाच ! खा. नीलेश लंके यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे Railway संदर्भात खा. लंकेंची बैठक ! निंबळक, विळद येथील…
- CNG vs Electric Car : कोणती कार खरेदी करावी ? – कोणत्या कारचा खर्च कमी आणि मायलेज जास्त
- Volkswagen कार्स स्वस्तात ! मार्च महिन्यात Virtus, Taigun आणि Tiguan चार लाखांनी स्वस्त
- Maruti Suzuki Celerio वर 80 हजारांची ऑफर ! 6 एअरबॅग्स आणि 35Km+ मायलेजसह बेस्ट डील