अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.
तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही. त्यामुळे शहरास उतरती कळा लागली.

या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. आमदार झाल्यानंतर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवन देईन, छिंदम याने जगताप, राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
- नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
- आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं
- फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…
- मोठी बातमी ! पुण्यातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर येणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा













